ration card Maharashtra नमस्कार मित्रांनो राशन कार्ड वर जे काय राशन मिळत आहे. त्याऐवजी रोख रक्कम मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक प्रकारचा अर्ज करावा लागणार आहे. तर या संदर्भात शासनाने अधिकृत शासन निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे. तरी या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हा अर्ज तुम्हाला कुठे सबमिट करायचा आहे..? तसेच रोख रक्कम मिळताना ती किती मिळणार आहे..? या संदर्भातील माहिती याठिकाणी बघणार आहोत.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
राशन एवजी पैसे कोणाला मिळणार आहेत.?
ration card Maharashtra शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये ही योजना लागू झालेली आहे. तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या संदर्भात क्रमांक एक येथील दिनांक 24 7 2015 रोजी शासन निर्णय अंतर्गत राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड ,बीड ,उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम ,अकोला, बुलढाणा, यवतमाळ, आणि वर्धा अशा 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमन 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केसरी राशन कार्ड धारकांना अर्थात शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे अन्नधान्य मिळत होते.
त्यांना आता अन्नधान्य न देता त्याच्या बदल्यामध्ये रोख रक्कम देण्यात येणार आहे तर एन एफ एस ए योजनेअंतर्गत गहू बावीस रुपये प्रति किलो आणि तांदूळ ते वीस रुपये प्रति किलो या दराने खरेदी करण्यात येत होती तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू आणि तांदूळ उपलब्ध होणार असल्यास भारतीय अन्न महामंडळाने पत्राद्वारे कळवलेला आहे तर हीच रक्कम डायरेक्ट बेनिफॅन्सी ट्रान्सफर या प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज कसा करावा ..?
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करणे गरजेचे आहे. सदर ला अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे. तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकतात. सदर योजनेबद्दल अधिक माहिती तुम्हाला तहसील कार्यालय किंवा राशन धान्य दुकान यामधून मिळू शकते.
तर योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करा. आणि तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये दाखल करा.अधिक माहिती साठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून शासन निर्णय पहा.